harshwardhan patil
sakal
पुणे - ‘बदलत्या जीवनशैलीत आरोग्यविषयक जागरूकतेमुळे साखर खाणारा वर्ग कमी होत आहे. परिणामी साखरेचा घरगुती होत असलेला वापर मर्यादित झाला आहे. याशिवाय शीतपेयांमध्येसुद्धा साखरेचे प्रमाण घटल्याने साखर उद्योगासमोर चिंतेची परिस्थिती आहे,’ असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तसेच साखर निर्यातीसाठी पाच लाख टन अतिरिक्त कोट्याची मागणीही यावेळी केली.