दावडी - खेड तालुक्यातील रेटवडी येथील समीर भिमाजी जाधव (वय ३०) हा तरुण सोमवारी सकाळी १०:५५ च्या सुमारास ओढ्याच्या पुलावरून दुचाकीसह वाहून गेला. मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते..समीर जाधव हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस, ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम हाती घेतली. मात्र, पावसाचा जोर आणि पाण्याचा वेग यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत..‘आम्ही दिवसभर शोध घेत आहोत, मात्र तो अद्याप सापडलेला नाही. तो लवकर सापडावा हीच प्रार्थना आहे,’ अशी भावनिक प्रतिक्रिया समीरची बहीण वैशाली जाधव यांनी दिली. पंचायत समिती सदस्य दिलीप दुबे म्हणाले, ‘या पुलाची उंची कमी असल्याने यापूर्वीही येथे अपघात झाले आहेत. नागरिकांनी पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. एनडीआरएफच्या पथकाची मागणी तहसीलदारांकडे केली असून, भविष्यात पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.