
पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांकडील मुलींची शिक्षणातील गळती रोखण्यासाठी आता जिल्हा परिषद पुढाकार घेणार आहे. यासाठी सातवीनंतरच्या अशा मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे सभापती रणजित शिवतरे यांनी आज (ता. २) सांगितले.
यासाठी जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तीस लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. येथल्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही शिवतरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंतच्या शाळा आहेत. काही आठवीचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र ज्या ठिकाणी सातवीनंतरच्या शिक्षणाची सोय नाही. अशा गावांमधील मुलींचे शिक्षण सातवीनंतर थांबते आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींची माध्यमिक शिक्षणात गळती वाढू लागली आहे. विशेषत: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि वाड्या-वस्त्यामध्ये ही समस्या मोठी आहे.
अशा मुलींचे शिक्षण थांबू नये. शिवाय त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. तसेच केवळ आर्थिक चाचणीमुळे त्यांच्या शिक्षणाला ब्रेक बसणार नाही, यांची काळजी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग घेणार आहे. यासाठी संबंधित मुलींना पूढील शिक्षण घेण्यासाठी अन्य गावात जाण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.