

PMJAY
Sakal
Ayushman Bharat scheme : भारत सरकारने गरीब आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मोफत किंवा किफायतशीर आरोग्य सेवा देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतो. यासाठी प्रत्येकाला आयुष्मान कार्ड बनवावे लागते. ही योजना भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनांपैकी एक मानली जाते.