
सरकारने सर्वसामान्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत स्पष्ट केले. दैनंदिन व्यवहारांसाठी UPI वापरणाऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायक आहे. २२ जुलै रोजी राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबद्दल माहिती दिली.