
- किरांग गांधी (अनुभवी आर्थिक मेंटॉर)
भारताला भूतकाळात अनेक वेळा भू-राजकीय धक्क्यांचा सामना करावा लागला आहे. परंतु, इतिहासाने हे दाखवले आहे, की युद्धासारख्या स्थितीतही शेअर बाजारातील प्रत्येक मोठी घसरण गुंतवणुकीसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतरची पाकिस्तानबरोबरची तणावाची परिस्थिती लक्षात घेता, शेअर बाजारातील तीव्र चढ-उतारांमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता, यातील संधीचा लाभ घेतला पाहिजे. युद्धं ही राष्ट्रीय निर्धाराची आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या शिस्तीचीही परीक्षा घेतात, हे लक्षात घेऊन आपले धोरण आखणे गरजेचे आहे. इतिहासातील काही महत्त्वाची उदाहरणे आणि तत्कालीन स्थितीत निर्माण झालेली गुंतवणुकीची संधी हे जाणून घेऊ या.