
ॲड. रोहित एरंडे - कायद्याचे अभ्यासक
‘पैसे असतील, तर आजारी पडा’, असे गमतीने म्हटले जाते. याचे कारण सध्याच्या काळात हॉस्पिटलमधील उपचार हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. वेळ काही सांगून येत नाही म्हणून आरोग्य विमा घेणे चांगले असते, परंतु भारतात फक्त ३८ टक्के लोकांकडे आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) असल्याचे मागील वर्षातील आकडेवारी सांगते.