

The Three Scenarios: Understanding Bull, Base, and Bear Cases for Indian Stocks
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
सध्या शेअर बाजारात चढ-उतार सुरू असले, तरी जागतिक ब्रोकरेज फर्म ‘जेफरीज’ भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत कमालीची सकारात्मक आहे. ‘जेफरीज’च्या मते, भारतीय शेअर बाजार सध्या एका ‘हेल्दी कन्सॉलिडेशन’मधून जात असून, मार्च २०२८ पर्यंत ‘निफ्टी’ २८,००० चा टप्पा गाठू शकतो. सध्याची बाजारातील मरगळ ही कायमस्वरूपी नसून, ती पुढील मोठ्या तेजीची तयारी आहे. शेअर बाजार पुढील दोन-तीन वर्षांत नव्या उच्चांकावर जाऊ शकतो, असा विश्वास ‘जेफरीज’ने व्यक्त केला आहे. यामागे भारताची मजबूत अर्थव्यवस्था, वाढता कॉर्पोरेट नफा, मजबूत देशांतर्गत गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवरील मोठा खर्च ही प्रमुख कारणे आहेत. विशेषतः ऊर्जा, रिअल इस्टेट, खासगी बँका, युटिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हीच मोठी संधी आहे.