Term Insurance : ‘टर्म इन्शुरन्स’ घेण्याच्या प्रमाणात मोठी वाढ ; आर्थिक सुरक्षेसाठी प्राधान्याचा पर्याय

देशाच्या पश्चिम भागात आर्थिक सुरक्षेबाबत जागरूकता सर्वाधिक असून, मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
Term Insurance
Term Insurancesakal

मुंबई : देशाच्या पश्चिम भागात आर्थिक सुरक्षेबाबत जागरूकता सर्वाधिक असून, मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७२ टक्के लोकांनी विमा पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली असून, त्यात मुदत विमा घेण्याचे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षी हे प्रमाण २९ टक्के होते, ते आता ३६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

आपल्याकडे पुरेसे मुदत विमा सुरक्षा कवच आहे, असा विश्वास असणाऱ्या लोकांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या ५३ टक्क्यांवरून ६२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ‘मॅक्स लाईफ’ विमा कंपनीने केलेल्या ‘इंडियन प्रोटेक्शन कोशंट स्टडी’ या सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशाच्या पश्चिम विभागातील २५ शहरांतील ४७०० लोकांचा या सर्वेक्षणात सहभाग होता.

या सर्वेक्षणानुसार, शहरी भागात विमा घेताना हप्त्याच्या रकमेपेक्षा एकूण रक्कम आणि वैशिष्ट्यांवर भर दिला जात आहे. विम्याच्या वैशिष्ट्यांवर भर देण्याचे प्रमाण मागील वर्षातील ५६ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढले असून, टर्म रायडरचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून ५७ टक्के झाले आहे. वैद्यकीय खर्चाचे व्यवस्थापन करण्याबाबत ६६ टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या डिजिटल विश्वात शहरी नागरिक फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर मुदत विम्याबाबत माहितीचा पहिला स्रोत म्हणून करत आहेत.

Term Insurance
Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

मुंबईतील लोक अनिश्चिततेची परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक तयार झाल्याचे दिसून आले असून, या सर्वेक्षणात मुंबईतील आर्थिक सुरक्षा निर्देशांक ६१ आहे. मागील वर्षी तो ५८ होता. मुंबईतील लोकांचा माहिती निर्देशांक ८४ आहे. तो महानगरांतील सर्वोच्च आहे. त्यामुळे भविष्याच्या सुरक्षिततेसाठी विम्याच्या उपयुक्ततेबाबत त्यांना चांगली माहिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरांमध्ये मुंबईतील ८४ टक्के लोकांकडे विमा आहे. शहरी भागात बचतीबद्दल जागरुकता वाढली आहे. सुट्ट्या आणि प्रवासासाठी बचतीचा कल वाढत असून, मागील वर्षीच्या सात टक्क्यांवरून हे प्रमाण १४ टक्के झाले आहे. या विभागातील २३ टक्के लोकांनी लवकर निवृत्ती घेण्याच्या उद्दिष्टाला प्राधान्य दिले आहे आणि तो बचतीमागचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्याबाबतही जागरुकता वाढली असून, शहरी भागात दोनपैकी एकजण चालणे, जिम, योगा आणि व्यायामासारख्या गोष्टी नियमित करतात.

सर्वेक्षणातले महत्त्वाचे मुद्दे

  • आर्थिक स्थैर्यासाठी विमासुरक्षेबाबत पश्चिम भारत आघाडीवर

  • शहरी भागात तीनपैकी एका व्यक्तीकडे मुदत विमा

  • मुंबईतील दहापैकी सहा लोकांकडे मुदत विमा

  • मुदत विम्यासाठी सोशल मीडिया माहितीचा पहिला स्रोत

आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि विमा गुंतवणुकीबाबत गेल्या सहा वर्षांत पश्‍चिम भागात वाढलेली जागरूकता लक्षणीय आहे. लोक मोठ्या संख्येने विमा घेत आहेत. आर्थिक सुरक्षेबद्दल जागृती करण्यासाठी ‘इंडिया प्रोटेक्शन कोशंट’ सर्वेक्षण मार्गदर्शक ठरले असून, लोकांना सेवा पुरवण्यासाठीही याचा उपयोग होईल.

- प्रशांत त्रिपाठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मॅक्स लाइफ इन्शुरन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com