हरिद्वार : पतंजलीची आयटी कंपनी भरुआ सोल्यूशन्सने पतंजलीसह अनेक कंपन्यांना आपल्या कौशल्याने प्रभावित केले असून, अनेक कंपन्यांबरोबर करार केले आहेत. या कंपनीच्या बळावर पतंजली आयटी क्षेत्रातही क्रांती घडवेल, असा विश्वास पतंजली योगपीठाचे संस्थापक अध्यक्ष स्वामी रामदेव यांनी व्यक्त केला.
पतंजली विश्वविद्यालयात आयोजित व्यावसायिक विकासासाठी कॉर्पोरेट प्रशिक्षण या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आचार्य बाळकृष्ण यांच्यासह भरुआ सोल्यूशन्सचे अध्यक्ष इरेंद्र छाबडा, उपाध्यक्ष कविंद्र सिंह,
पतंजली आयुर्वेदच्या आयटी विभागाचे प्रमुख पवन सिंह यांच्यासह कंपनीच्या हरिद्वार, हैदराबाद, नोएडा शाखांमधील २५०हून अधिक कर्मचारी उपस्थित होते. आचार्य बाळकृष्ण म्हणाले, ‘‘पतंजलीला सगळे जग योग आणि आयुर्वेदासाठी ओळखते.
मात्र, ‘भरुआ सोल्यूशन्स’च्या माध्यमातून आम्ही माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रात प्रवेश केला आहे. या कंपनीकडे आठ पेटंट असून, वेल्सपन, मदर डेअरी, अमूल अशा दिग्गज कंपन्यांसह भारतीय रेल्वे, नव्या संसदभवनातील कॅंटिनमध्ये ‘भरूआ’च्या सेवांचा वापर केला जात आहे.
कंपनीकडे जागतिक स्तरावरील सुविधा व सर्टिफिकेशन उपलब्ध असून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सॉफ्टवेअर तयार केली जात आहेत. आमच्या बहुतांश कंपन्यांमध्ये तिच्याच सेवा वापरत आहोत.’’ यावेळी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.