
मुंबई : टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीने रायजिंग इंडिया फंड ही नवी योजना दाखल केली आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत खुली आहे. आत्मनिर्भर भारताच्या घोडदौडीला वेग मिळवून देणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा, उत्पादन, बँकिंग, डिजिटल, संरक्षण आदी प्रमुख क्षेत्रातील कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करणार आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना देशाच्या वेगवान आर्थिक वाढीचा लाभ घेता येईल.
भांडवलामध्ये मूल्यवृद्धी करण्यासाठी हा फंड ७० टक्के ते १०० टक्के गुंतवणूक शेअर व शेअरशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करेल, तर ३० टक्के गुंतवणूक अन्य पर्यायांमध्ये केली जाईल. या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे जोखीम कमी होऊन चांगला लाभ मिळेल, अशी माहिती ‘टाटा एआयए’चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी (सीआयओ) हर्षद पाटील यांनी दिली.
‘‘आर्थिक सुरक्षा, संपत्ती निर्मिती आणि ग्राहकांच्या आरोग्य व कल्याणासहित विविध गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन विमा योजना कंपनी तयार करते. या नव्या योजनेमुळे गुंतवणूक व विमा या दोन्ही गरजा पूर्ण होतील, असा आम्हाला विश्वास आहे.
परम रक्षक श्रेणीतील प्रो-फिट, परम रक्षक, परम रक्षक प्लस आदी पर्यायांसह या योजनेचा लाभ घेण्याची सुविधा आहे. त्यामुळे दीर्घकालीन परताव्यासह कुटुंबाच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाते,’’ असे टाटा एआयएचे अध्यक्ष समित उपाध्याय यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.