Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात पुण्याचा महसूल किती होता? इतिहासाचा उलगडा

Economic Contribution of Pune Revenue in Shivaji Maharaj Swarajya|छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पुण्याचा महसूल महत्त्वाचा होता. त्यांच्या प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थेचा हा आढावा.
Shivaji Maharaj
Shivaji Maharajesakal
Updated on

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठ्यांच्या स्वराज्याची स्थापना करताना केवळ लष्करी सामर्थ्यावरच नव्हे, तर सुव्यवस्थित प्रशासन आणि आर्थिक नियोजनावर भर दिला. स्वराज्याच्या आर्थिक यशाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पुण्यासारख्या प्रमुख महालांचा महसूल. सभासद बखरीनुसार, शिवाजी महाराजांनी आपल्या शेवटच्या काळात विश्वासू अधिकार्‍यांना बोलावून स्वराज्याच्या कारभाराची दिशा स्पष्ट केली होती. यामध्ये त्यांनी पुण्याच्या महालांचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. महाराज म्हणाले, “माझ्या राज्यात पुण्याचे महाल आणि चाळीस हजार होणाची महत्त्वाची भूमिका होती.” यावरून पुण्याचा आर्थिकदृष्ट्या असलेला प्रभाव स्पष्ट होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com