

To Argue or Not? Why Wise Men Should Avoid Proud Scholars and Ignorant Foes
Sakal
श्रीनिवास हेमाडे
वाद-संवाद शहाण्या आणि विद्वान लोकांमध्ये घडावा, अशी अपेक्षा असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात परिषद, चर्चासत्र, परिसंवाद (आजच्या भाषेत समाज माध्यमे) इत्यादी ठिकाणी ज्ञानी वाद-चर्चेसाठी गेलाच तर तिथे त्याला शहाणा अन् ज्ञानी चर्चक भेटेल असे नाही, मूर्ख माणूसही भेटू शकतो; पण ‘मूर्ख भेटेल’ हे आधी माहीत नसते. म्हणून महर्षी चरकाचार्य परिषदेचे दोन प्रकार करतात : ज्ञानवती परिषद आणि मूढ परिषद. ज्ञानी चर्चकांची ‘ज्ञानवती परिषद’ आणि मूर्ख लोकांची ‘मूढ परिषद’. तथापि ज्ञानी व मूर्ख लोकांमध्येही काही प्रकार होतात. म्हणून चरकाचार्य पुन्हा ज्ञानवती आणि मूढ या दोन मुख्य परिषदांचे प्रत्येकी तीन उपप्रकार करतात (सुहृत्परिषत्, उदासीन परिषत्, प्रतिनिविष्ट परिषेच्चेति) :