आदिगुरू श्री दत्तात्रेय

दत्तात्रेयांच्या अनंत अवतारकार्याची परंपरा, अज्ञानाचा नाश आणि आत्मज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या त्यांच्या सद्गुरू तत्त्वज्ञानाची सखोल मांडणी येथे आहे. नाथ, महानुभाव, वासुदेवानंद सरस्वती, स्वामी समर्थ अशा अवतारांच्या माध्यमातून चालू असलेल्या दत्त परंपरेचे विश्लेषण.
Datta Jayanti

Datta Jayanti

sakal

Updated on

भारतीय परंपरेतील सर्व अवतार एका विशिष्ट कारणासाठी, शत्रूचा नाश करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरले व शत्रूचा नाश झाल्यानंतर म्हणजेच अवतारकार्य समाप्त झाल्यानंतर ते पुन्हा अंतर्धान पावले; परंतु अज्ञानरूपी शत्रूचा ज्ञानरूपी हत्याराने नाश करायला व ज्ञान सर्व मनुष्यमात्राला द्यायचे कार्य श्रीदत्तात्रेयांचे असल्यामुळे दत्तात्रेयांचा अवतार समाप्त झालेला नाही. दत्तात्रेय कायम पृथ्वीच्या पाठीवर कार्य करत असतात. ही सद्‍गुरू परंपरा आत्मज्ञान करून घेण्यासाठी अज्ञानाचा व दुर्वृत्तींचा नाश करण्यासाठी कार्यरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com