

Pune’s DJ debate gets a hilarious twist as British Nandi turns the controversy into satire.
Sakal
सहासष्टमध्ये प्रा. वसंत कानेटकरांनी ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक लिहिले. त्यात प्रोफेश्वर विद्यानंद, लाल्या, धर्माप्पाशेठ अशी पात्रे होती. लाल्या पुण्याचा असावा, पण रत्नांग्रीहून आलेल्या गारंबीच्या बापूसारखा दिसत असावा, असा आमचा कयास होता. तो खरा ठरला. प्रो. विद्यानंद हेदेखील पुण्याचेच असून नारायणपेठ नावाच्या अगदी ज्याला ‘हार्ट आफ धी पुणे’ म्हंटात तिथले असणार, असे आम्हांस वाटायचे. तेही आठ वर्षापूर्वी रत्नांग्रीतून थेट नारायण पेठेत डेरेदाखल झाल्यासारखे दिसत असावेत, असाही आमचा उपकयास होता. पण हा झाला इतिहास.