Digital India Revolution From Queues to Quick Payments
Sakal
संपादकीय
तंत्रज्ञानातून परिवर्तन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांनी देशात घडविलेल्या तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाचा आढावा घेणारा लेख.
अश्विनी वैष्णव
आठवतंय, जेव्हा सरकारी कागदपत्र मिळवणे म्हणजे एक कर्मकहाणी होती?
सततच्या खेपा, लांबचलांब रांगा, कितीतरी शुल्काचा खर्च? आता हे काम तुमच्या फोनमध्येच होतं. हे परिवर्तन काही अपघाताने घडून आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही किमया घडवून आणली ती तंत्रज्ञानाच्या कल्पक उपयोजनाच्या जोरावर. मुंबईतील रस्त्यावरचा विक्रेतादेखील तीच युपीआय भरणा प्रणाली वापरतो जिचा वापर एक मोठा कॉर्पोरेट अधिकारीही करतो. तंत्रज्ञान सर्वांसाठी सारखे.

