Acid Attack
sakal
ॲसिड हल्ले केवळ शारीरिक हल्ले नसून ते पीडितेला आयुष्यभर मानसिक आणि सामाजिक यातना देणारे कृत्य आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यात अपयश का येत आहे, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
एकाहून एक कठोर कायदे केल्यानंतरही महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी न होता उलट वाढू लागल्या आहेत. केवळ पोलिस वा सरकार नव्हे, तर साऱ्या समाजानेच गंभीर दखल घेतल्याशिवाय त्यावर उपाय सापडणार नाही, अशी स्थिती येऊन ठेपली आहे. संगमनेरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेचे संतप्त पडसाद उमटले; पण अशी एखादी घटना घडली की तात्पुरता उद्रेक होतो आणि विरूनही जातो.