bhondubaba
sakal
एखाद्याचा काटा काढण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यात राजकारणीच आघाडीवर दिसतात, हे या राज्याला भूषणावह नाही.
महाराष्ट्राने एखाद्या गोष्टीत पुढाकार घ्यावा आणि इतर राज्यांनी किंवा साऱ्या देशाने त्याचे अनुकरण करावे, ही स्थिती एकेकाळी होती. मग ती रोजगार हमी योजना असो, कृषी-औद्योगिक विकासासाठी घेतलेले निर्णय असोत, वा सामाजिक सुधारणांचा विषय असो. हे राज्य प्रगत आणि पुरोगामी आहे, असे म्हटले गेले, ते या गोष्टींमुळे.