
स्वायत्त निवडणूक आयोग हे भारतीय लोकशाहीतील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, पण या संस्थेवर होत असलेल्या आरोपांमुळे तिची विश्वासार्हता आणि स्वायत्तताही झाकोळली गेली आहे. दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांत झालेल्या बेरजा आणि वजाबाक्यांचा मुद्दा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या डेटा अभ्यासक सहकाऱ्यांनी ऐरणीवर आणला. यानिमित्ताने निवडणूक आयोगाचा गोपनीयता व पारदर्शतेच्या लपवाछपवीचा खेळही चर्चेत आला आहे.