

Aravalli Mountains and Ecological Importance
Sakal
जगातील सर्वांत जुन्या पर्वतरांगांमध्ये समावेश असलेल्या अरावलीची भारताच्या विद्यमान भौगोलिक रचनेत महत्त्वाची भूमिका आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातचा समावेश असलेल्या वायव्य भारताला आठशेहून अधिक किलोमीटर लांबीची अभेद्य तटबंदी लाभलेल्या अरावली पर्वतरांगांवर ओढवलेल्या संकटावरुन निर्माण झालेला प्रश्न म्हणजे विकास आणि पर्यावरणसंरक्षण यातील संघर्षाचे ज्वलंत उदाहरण. बेकायदा खाणकाम, जंगलतोड आणि अनियंत्रित बांधकाम थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग असलेल्या अरावलीमध्ये खाणकाम होऊ शकत नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने १९९२मध्ये दिलेला निर्णय आजगायत कायम आहे.