अग्रलेख - कृष्णेच्या काठाकाठाने

‘गुंगीत राहाल, तर कायमचे संपून जाल’, हा संमेलनाध्यक्षांचा इशारा योग्य असला तरी त्यावरचे उत्तर शोधण्यासाठी अधिक गांभीर्याने सखोल विचारमंथन आणि कृतीची गरज आहे.
Marathi Identity and the Role of Sahitya Sammelan

Marathi Identity and the Role of Sahitya Sammelan

esakal

Updated on

साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने मराठी समाज आणि मराठी साहित्य यांची स्थितिगती आणि भवितव्य याविषयी मंथन होणे ही स्वाभाविक असते. त्यामुळेच राजकीय-सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या, देदीप्यमान इतिहासाच्या खुणा मिरवणाऱ्या साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांच्यासारखा दमदार साहित्यिक मराठी अस्मितेची तुतारी स्वप्राणाने फुंकून मराठी मनांमध्ये निर्माण झालेली मरगळ झटकून टाकेल, असा आशावाद अनेकांच्या मनात होता. तो कितपत फलद्रुप झाला, हा प्रश्न आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com