
खेळात राजकारण नको आणि राजकारणात खिलाडूवृत्ती हवी, असे म्हटले जाते. पण या दोन्ही उक्तींचा सपशेल पराभव पाहायचा असेल तर तो कुस्तीच्या आखाड्यात पाहायला मिळतो आहे. अहिल्यानगरमधील ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीस्पर्धेतील निकालांमुळे समोर आलेले चित्र याचाच प्रत्यय देणारे होते. ही स्पर्धा जशी वादामुळे गाजली, तशी बक्षिसांमुळेही. ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज मोहोळ आणि त्या आधीचा ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे यांच्यातील कुस्ती वादात सापडली. त्यानंतर झालेल्या किताबी लढतीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे कुस्तीप्रेमींसह सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या.