

plane crash
esakal
बहुतांश विमान अपघात एका कारणामुळे नव्हे, तर घटनांच्या साखळीमुळे घडतात. त्यात मानवी चुकांचा ८० टक्के वाटा असल्याचे निदर्शनास आले आहे. हे टाळण्यासाठी सर्वंकष उपायाची गरज आहे.
नैसर्गिक किंवा कोणत्याही प्रकारची आकस्मिक आपत्ती कोसळल्याने होणारी जीवित वा वित्तहानी यांकडे ‘पराधीन आहे जगती...’ या दृष्टिकोनातून पाहिले जाण्याची शक्यता असते. प्रत्येक जण आपापल्या परीने अशा घटनांचा अर्थ लावू पाहतो. कोणी नियतीला दोष देतो.