
सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता आपला बाणा टिकविणे, आपली प्रतिमा सांभाळणे ही जबाबदारी न्यायाधीशांचीही असते.
निःपक्ष न्यायव्यवस्था हे लोकशाहीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. कोणतीही सत्ता केंद्रित झाली तर ती जुलमी बनण्याची शक्यता असते. म्हणूनच लोकांनी निवडून दिलेले सरकार असले तरी त्याच्या कारभारावर विरोधकांचा अंकुश ठेवलेला असतो, त्याचप्रमाणे न्यायालयाचाही. घटनेला नियंत्रण आणि समतोलाची रचना अपेक्षित आहे.