

Mumbai waste
sakal
मुक्ता आठवले
प्रत्येक शहराचा एक ‘वारसा’ असतो. मुंबईचा वारसा म्हणजे स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याचा विलक्षण ध्यास घेऊन संधीचे सोने करण्याचा आहे. लाखो लोक या शहरात येतात, मेहनतीने आपली ओळख निर्माण करतात आणि आपल्या कार्याचा ठसा मागे सोडतात; पण स्वप्नांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा वारसा आता कचऱ्याचे ढीग, राख आणि प्रदूषण असा होणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.