महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी भरारी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रुपाने महाराष्ट्र प्रगतीच्या आकाशात नवी भरारी घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन विमानतळाचे उद्घाटन होत आहे. हा केवळ एका प्रकल्पाचा प्रारंभ नसून, संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक भविष्याचा निर्णायक क्षण ठरणार आहे.
Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport

Sakal

Updated on

मुरलीधर मोहोळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला मिळणारी ही सुविधा. ती राज्याला नव्या युगात नेणारी ठरेल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार, दळणवळण व पर्यटनाचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर दररोज शेकडो उड्डाणे होत असून, प्रवाशांचा आकडा वर्षागणिक विक्रमी वाढत आहे. मात्र, जागेअभावी विस्तार मर्यादित असल्याने वाढत्या हवाई वाहतुकीचा भार सांभाळणे कठीण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com