
राजधानी मुंबई
पहिलीपासून हिंदी सक्तीसाठी काढलेले दोन्ही आदेश जनमताच्या रेट्यामुळे राज्यसरकारने मागे घेतले. त्याचा आनंद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह मुंबईकरांनी पाच जुलै रोजी वरळीस्थित ‘एनएससीआय डोम’मध्ये साजरा केला. त्याला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. अर्थात त्यामागे मराठी माणसाच्या मनातील खंतही होती.