
हौस ऑफ बांबू
न अस्कार! वादे वादे जायते तत्त्वबोध: असं कुणीतरी लिहिलेलं आठवतंय. कुणी बरं? हां, आठवलं! आमच्या वर्गातल्या (इयत्ता आठवी फ) बंडू बर्वेनं फळ्यावर लिहिलं होतं. त्याचं अक्षर सुरेख होतं. पण कुणीतरी नतद्रष्ट पोरानं ‘व’ चा ‘प’ केला, आणि बिचाऱ्या बंडूनं सरांचा मार खाल्ला होता. असो. लहानपणची ही आठवण. पण ती तरी का आठवली? हां, आत्ता आठवलं. ‘केल्याने अनुवाद मनुजा चातुर्य येतसे फार’ अशा आशयाचं एक खरमरीत पत्र मराठी भाषेचे बिनीच्या फळीतील शिलेदार रा. रा. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पाठवलं आहे.