
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडमधील एकदिवसीय व टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाने विजयाला गवसणी घालत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय आणि पुढल्या वर्षी जून-जुलै या कालावधीत टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय महिला संघाकडे या दोन्ही स्पर्धांचे अजिंक्यपद पटकावून नवा अध्याय लिहिण्याची संधी आहे.