तेरे-मेरे मीलन की ये रैना
नया कोई गुल खिलाएगी
तभी तो चंचल है तेरे नैना
देखो ना, देखो ना...
भारत देशातल्या पुरातन पुरुषप्रधान संस्कृतीत बाईला नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. अर्धांगिनी म्हणतानासुद्धा पत्नीला डाव्या बाजूला बसवून तिला ‘वामांगी’च संबोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महात्मा जोतीराव फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी स्त्री-पुरुष समानतेचा विचार पसरवून या वृत्तीला छेद देण्याचा जो प्रयत्न केला, त्यानं पुष्कळसा बदल जरी घडवला तरी नारीपेक्षा नर श्रेष्ठ असल्याची पुरुषी मानसिकता डोकं वर काढतेच काढते.