पाण्याचं समान वाटप हवं

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजस्थानात महाराणा प्रताप हे स्वराज्याचे संस्थापक मानले जातात. हे दोघेही स्वराज्यनिर्माते मानले जातात.
Water
WaterSakal

- डॉ. राजेद्रसिंह, saptrang@esakal.com

सूर्य म्हणजे आदित्य. तो स्वतःच्या इच्छेनं नियमितपणे उगवतो आणि मावळतो; परंतु प्रत्येकाच्या जीवनाला सतत पोषण देणाऱ्‍या ऊर्जेनं पाणी निर्माण करून तो पृथ्वी, निसर्ग, मानवता आणि संपूर्ण विश्वाचं पोषण करत आहे. या प्रकारचं पोषण जलस्वराज्यातही अंतर्भूत आहे.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजस्थानात महाराणा प्रताप हे स्वराज्याचे संस्थापक मानले जातात. हे दोघेही स्वराज्यनिर्माते मानले जातात. त्यांनी कोणाकडेही आपलं राज्य, हक्क मागितले नाहीत, तर कर्तव्य पार पाडण्यासाठी सत्याग्रह आणि संघर्ष केला. संघर्षातील विजय-पराजय हे त्यांचं मुख्य ध्येय नव्हतं; परंतु ते आपलं कर्तव्य मानून त्यांनी स्वराज्याचं मुख्य ध्येय निश्‍चित केलं.

लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे सूर्याच्या प्रेरणेनं सांगितलं होतं. आज त्यांच्या या विधानाला भारतभर मान्यता मिळाली आहे. लोकमान्य टिळकांनी विजय-पराजयाची चिंता न करता कर्तव्य बजावताना म्हटलं होतं की, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ तेव्हापासून देशातील महनीय व्यक्तींनी प्रचंड प्रयत्न केले.

महात्मा गांधींच्या स्वराज्याची प्राप्ती सूर्याच्या सत्याशी आणि निसर्गाच्या अहिंसेशी जोडलेली आहे. निसर्ग कधीच कोणाकडून आपले हक्क मागत नाही, तो आपलं कर्तव्य लक्षात घेऊन काम करतो, जेणेकरून आपल्याला हक्क मागण्याची गरज भासत नाही. आपलं कर्तव्य अखंडपणे जाणण्याची पूर्ण भावना असेल, तरच आपण ‘स्वराज्य’ टिकवू शकतो.

आज बापूजी हयात असते, तर त्यांनी पाण्याचं खासगीकरण आणि ‘मार्केटिंग’विरोधात सत्याग्रह केला असता. सर्वांना समान पाणी सन्मानाने मिळालं पाहिजे, जेणेकरून जलसंरचनेचं विकेंद्रीकरण करून सर्वांना समान मालकी मिळेल. महात्मा गांधी हे यशस्वी झाले, कारण त्यांनी स्वराज्य मिळवण्यासाठी कोणतीही तीव्रता दाखवली नाही; परंतु तत्परतेनं पूर्ण भारतातील जनतेला स्वराज्याचं कर्तव्य बजावण्यासाठी तयार केलं. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष सृजनात्मक कार्य आणि अहिंसक सत्याग्रह केला होता.

जानेवारी १९२१ मध्ये मोहनदास करमचंद गांधी त्यांच्या पुस्तकात ‘हिंद स्वराज्य’ या विषयाबद्दल लिहितात की, ‘मी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या चित्राप्रमाणे स्वराज्य स्थापनेसाठी आज माझे प्रयत्न सुरू आहेत. मला माहीत आहे की, भारत अजून त्यासाठी तयार नाही. पण मी इथं ज्या प्रकारचं स्वराज्य अभिप्रेत करतो आहे, ते मिळवण्याचा माझा वैयक्तिक प्रयत्न नक्कीच सुरू आहे, असा माझा ठाम विश्वास आहे.

परंतु, भारतातील लोकांच्या इच्छेनुसार ‘संसदीय प्रकारचं स्वराज्य’ साध्य करणं हे आज माझ्या सामूहिक प्रवृत्तीचं उद्दिष्ट आहे यात शंका नाही. रेल्वे अथवा रुग्णालयं उद्ध्वस्त करण्याचा उद्देश माझ्या मनात नाही. त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर मी त्यांचं नक्कीच स्वागत करेन. रेल्वे अथवा रुग्णालय हे उच्च आणि पूर्णपणे शुद्ध संस्कृतीचं लक्षण नाही.

जास्तीत जास्त आपण असं म्हणू शकतो की, हे एक वाईट आहे, जे टाळता येत नाही. या दोघांपैकी कोणीही आपल्या राष्ट्राच्या नैतिक उंचीत एक इंचही भर घालत नाही. त्याचप्रमाणे, न्यायालयांचा कायमचा नाश माझ्या मनात नाही, जर असा निकाल आला तर मला नक्कीच खूप आनंद होईल. मी यंत्र आणि गिरण्या नष्ट करण्याचा कमी प्रयत्न करतो, त्यासाठी सत्याच्या आचरणात आज जितकी तयारी आहे, त्यापेक्षा जास्त साधेपणा आणि त्यागाची गरज आहे.’

आताच्या काळात बापूजींविरुद्ध (महात्मा गांधी) खूप वाईट प्रचार करण्यात आला. तो काळ स्वराज्यासाठी अशांततेचा होता. म्हणूनच बापू म्हणाले की, स्वराज्य हे सत्य आहे. हे साध्य करण्याचा माझा आग्रह आहे. सत्याग्रह-सत्याग्रह ही काही पोकळ गोष्ट नाही, त्यात लपवाछपवी नाही, त्यात कोणतीही गुप्तता नाही.

हिंद स्वराज्यात सांगितल्या गेलेल्या संपूर्ण जीवन-तत्त्वांचा एक भाग प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, यात शंका नाही. ते तत्त्व एकंदरीत लागू करण्यात काही धोका आहे असं नाही : पण ज्या भागांचा आज देशासमोरील प्रश्नाशी संबंध नाही, अशा भागांचे संदर्भ देऊन लोकांना भडकवणं हे कोणत्याही प्रकारे योग्य नाही.

कोणाला कसलाही त्रास न देता जो सदैव भयमुक्त राहतो आणि कसलीही चिंता न करता त्याच्या आग्रहावर ठाम राहतो, तो स्वराज्याचा विचार स्वीकारतो. तोच स्वराज्याचं कल्याण करू शकेल. आज स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या ७५ वर्षांनंतरही भारतात सर्वांना जीवन, उपजीविका आणि विवेकासाठी पाणी समान प्रमाणात उपलब्ध नाही.

काही लोक जास्त पाणी ताब्यात घेऊन पाण्याची नासाडी करत आहेत, तर अनेकांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही. त्यांची जमीन आणि पृथ्वीच्या पोटातलं पाण्याचं शोषण केलं जातंय.ज्याला ही जलसृष्टी समजेल, तोच खरा ठरेल.

याचा विचार करणाऱ्‍याच्या मनात येईल की, हे पाणी वरचेवर आहे. विचार करता करता मागे जा - या भूमीचा आधार आहे, त्याचा आधार आहे, हे करत असताना मागे-पुढे गेलात तर भगवंतापर्यंत पोहोचतो. पाणी हा देव आहे, ते नक्कीच असेल; पण ते मिळवण्याचा प्रयत्न करून, शिस्तबद्धपणे वापरायला शिका.

आपण सर्व महाविस्फोटातून निर्माण झालो आहोत. काही अब्ज वर्षांपूर्वी महाविस्फोटामधून पदार्थ, वेळ आणि स्थानाची उत्पत्ती झाली. ते आधी काय होतं, हे कोणालाच माहीत नाही. पृथ्वीवरील स्फोटांच्या इतिहासातून आपण शिकू शकतो. नैसर्गिक निर्मितीसाठी मोठे स्फोट होत आहेत. जोपर्यंत भौतिकशास्त्राची तत्त्वं नव्हती.

दुसरा महास्फोट त्यानंतर काही अब्ज वर्षांनंतर झाला; जेव्हा भौतिकशास्त्राची काही तत्त्वं तयार होत होती. मग पदार्थ आणि ऊर्जा यांच्या परस्परसंबंधातून रेणू तयार झाला. रसायनशास्त्र म्हणजे रेणू आणि अणूंच्या सह-संबंधांची समज. यातूनच जीवन-मरणाचं औषध तयार होतं. यावरून आपण आयुर्वेदाच्या सुरुवातीचा विचार करू शकतो.

जेव्हा माणसाला आसुरी तत्त्व प्राप्त होतं, तेव्हा तो विनाशाच्या मार्गावर चालतो; आणि जेव्हा शुभाची इच्छा असलेल्या माणसाला ज्ञान होतं, तेव्हा तो सार्वजनिक जाणिवेतून सर्वांसाठी सुख, आरोग्य, शांती, समृद्धीचा मार्ग शोधू लागतो आणि सेवेची भावना जागृत होते.

सर्वांच्या भल्यासाठी भयमुक्त करण्यासाठी आरोग्य संरक्षण आणि उपचारपद्धती शोधतो. सर्वांच्या भल्यामध्ये स्वतःचं भलं शोधून तो आपला आनंद सामाईक करतो, चांगुलपणाचे सर्व मार्ग शोधतो. अशा लोकांच्या जीवनात नैसर्गिक सत्याच्या सत्याला ‘ईश्वर’ हा परम माता-पिता-परम आत्मा मानून त्याच्यावर प्रेम, आदर, निष्ठा आणि भक्ती सुरू होते.

पृथ्वी केवळ ४.५ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. जोपर्यंत पृथ्वी जळत्या हवेचा गोळा होती, तोपर्यंत तिच्यावर कोरोनासारखा कोणताही विषाणू अथवा जीव नव्हता. पृथ्वीवर प्रचंड स्फोट झाल्यामुळे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिसळून पृथ्वीवर पाणी तयार झालं.

त्या वेळी पृथ्वी खूप उष्ण होती, त्यामुळे जीवसृष्टी शक्य नव्हती. त्यानंतर पाण्यानं पृथ्वी थंड केली. तिसरा मोठा स्फोट ३ अब्ज वर्षांपूर्वीचा होता, जेव्हा काही रेणू ‘पृथ्वीवर’ सामील झाले, तेव्हा त्यांना जिवंत प्राणी म्हटलं जाऊ लागलं. पाण्यात अमिबासारखा जीव जन्माला आला, नंतर पाण्याचं बाष्प बनल्यानंतर त्यातून ढग तयार झाले आणि पावसाची प्रक्रिया लाखो वर्षं सुरू राहिली.

३.४ अब्ज वर्षांपूर्वी समुद्राचं पाणी खूप गरम होतं, ज्यामध्ये असंख्य रेणू आणि अणू विखुरलेले होते. त्याला आदिम गरम सूप म्हणत. त्यावरून विजांचा कडकडाट व्हायचा. या विलक्षण वातावरणात, साध्या अणू आणि रेणूंनी अधिक जटिल संख्या तयार केल्या. ही आयुष्याची सुरुवात होती.

(लेखक आंतरराष्ट्रीय जल-पर्यावरणतज्ज्ञ अन् मॅगसेसे पुरस्कारविजेते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com