- डॉ. अनंत लाभसेटवार, saptrang@esakal.com
भारतानं गेल्या दशकात जी आर्थिक प्रगती केली, त्यामुळं देशातील श्रीमंतांची संख्या एवढी वाढली, की जागतिक कंपन्यांनी त्याची दखल घेतली. नुसतीच दखल घेतली असं नाही तर अशा लक्ष्मीधरांच्या खास गरजा व ऐशआरामी जीवनशैली याचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी देशात आपलं बस्तान बसवलं.