

Student Protest in Jharkhand
esakal
प्रियदर्शन - saptrang@esakal.com
देशातल्या सरकारी शाळांची स्थिती चांगली नाही, तर खासगी शाळांनी शिक्षणाला पूर्णपणे व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. तिथे भयावह एकसुरीपणा आहे, जो शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचे साधन बनवून टाकतो. विद्यार्थ्यांचा संताप केवळ एका परीक्षेतील गैरप्रकारामुळे निर्माण झालेला नाही. परीक्षांमधील गैरप्रकार, कमी होत चाललेल्या संधी आणि हातातून निसटत चाललेल्या वयाच्या पार्श्वभूमीवर हा सारा संताप निर्माण होत आहे. हा प्रश्न केवळ आजच्या विद्यार्थी आंदोलनांचा नाही; तो देशाच्या पुढील पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतर येथील आंदोलनानंतर रांचीच्या जयपाल सिंह स्टेडियममध्ये सुरू झालेले झारखंडमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी ठरले आहे. ज्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती, त्या रद्द करण्यात आल्या आहेत. जेपीएससीच्या अध्यक्षांना अटक करण्यात आली असून विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत न्याय केला जाईल, असा विश्वास दिला जात आहे. अर्थात झारखंडमधील विद्यमान हेमंत सोरेन सरकारचेही एक मोठे यश असे आहे की, सीबीआय चौकशीची मागणी तूर्तास मागे घेण्यासाठी ते विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात यशस्वी झाले आहे.