Krishnamachari Bose Artist
esakal
हर्ष भटकळ
कृष्णामाचारी बोस हे तारुण्याच्या उंबरठ्यावर लाकडाची आणि चामड्याची पादत्राणे बनवू लागले. ते कलेकडे वळले ते म्युझियमद्वारे नव्हे तर रोजच्या अनुभवातून. केरळात सुरू झालेला आणि मुंबईत वाढलेला जनसंपर्क बोस यांना देशाबाहेर घेऊन गेला. त्यांच्या कलाकृती आणि इन्स्टॉलेशन परदेशातही दाखवली जाऊ लागली. ते एक श्रेष्ठ भारतीय कलावंत मानले जाऊ लागले. आज त्यांच्या कलाकृती या महत्त्वाच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक संग्रहाचा हिस्सा बनल्या आहेत.
ते कलावंत आहेत, कलेचे संवर्धन करणारे कलारक्षक आहेत. कोची म्युझिरिस बिनाले या दोन वर्षातून एकदा भरणाऱ्या उत्सवाचे सहसंस्थापक आहेत. तरी कृष्णामाचारी बोस यांना वाटते की त्यांचे कलेचे शिक्षण हे वर्गात बसून झाले नाही तर अनेकांशी संवाद साधूनच झाले. त्यांच्या विलक्षण प्रवासाचे रहस्य याच विशेषात दडलेले असेल.