
कृष्ण जोशी joshikri@gmail.com
नुकतेच माधव जोशी लिखित ‘महाभारत ते भारत@२०२५’ हे विश्वकोशीय पुस्तक प्रकाशित झाले. इतिहास, राजकारण, कला, साहित्य, आर्थिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि समाजकारण अशा पन्नासएक क्षेत्रांमधील भारताच्या गेल्या साडेतीन हजार वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा आणि गौरवगाथा पाचशे पानांच्या या पुस्तकातून उलगडते.