
सर्वांना समानतेचा दर्जा देणारे महावीर
‘आयतुल्ले पायसु’ म्हणजे सर्व प्राणिमात्रांना आपले मानणे, आपल्या अस्तित्वाप्रमाणेच त्यांच्या अस्तित्वाचा आदर करा. ही अमर उद्घोषणा आहे. श्रमण म्हणजे समस्त मानवजातीला आणि जगातील सर्व खेडूत प्राण्यांना समानतेचा दर्जा देणारा महावीर होय. महावीरांच्या अहिंसेत सामान्य हिताचा विचार आणि संदेश आहे. त्यांच्या अनेकांत सर्वसमावेशकता आहे, सर्व विरोधाभासावर योग्य उपाय आहे. महावीरांच्या अपरिग्रहातील सर्वोदयाचे ध्येय म्हणजे उच्च-नीच, गरीब-श्रीमंत इत्यादी विषमता नष्ट करण्याची क्षमता.
महावीरांनी म्हटले आहे की, ‘कम्मुणा बंभणो होई, खत्तिओ होई कम्मुणा. कम्पुणा विइस्सो होई, सुद्दो हवई कम्मुणा’ म्हणजे फक्त कर्माने भेद असतो, हे समजून घेऊ नये, जन्मजात फरक ओळखावा. महावीरांमध्ये सर्वसमावेशकतेची जबरदस्त शक्ती आहे. सत्याचा आदर हाच संघर्षावर उपाय आहे. सत्य समजून घेण्याची आणि सत्य स्वीकारण्याची पद्धत म्हणजे सापेक्षतावाद आहे.
वस्तूच्या अनेक असीम शक्यता ओळखणे आणि शब्दांच्या मर्यादा लक्षात घेऊन वस्तूचे विविध किंवा भिन्न रूपात प्रस्तुतीकरण करणे म्हणजे सापेक्षतावाद होय. जैन परंपरेचे महान शिक्षक, श्री सिद्धसेन दिवाकर म्हणतात, ‘‘जावइया वयणपहा, तावइया चेव होंति नयवाया। जावइया नयवाया, तावइया चेव होंति ससमया.’’ जे काही नवीन आहे ते म्हणजे जैन तत्त्वज्ञान. स्वतःसारख्या इतरांच्या अस्तित्वाचा आदर करणे हा महावीरांच्या अहिंसेचा मूळ घटक आहे.’’
महावीरांनी अहिंसा आणि अध्यात्माच्या माध्यमातून जगाची व्याप्ती, वस्तू आणि विचार यांची योग्य मांडणी करून सुख, समृद्धी आणि समाधानाचा मार्ग मोकळा केला. भौतिकतेने वेढलेला मानवी समाज ज्या मार्गाने आपल्या अशांतता आणि दु:खापासून मुक्त होऊ शकतो, तो मार्ग म्हणजे खरा धर्म होय. या खऱ्या धर्माच्या, शाश्वत मूल्यांच्या जतन आणि संवर्धनात महावीरांची शिकवणही अतिशय योग्य आहे. हे आपल्या जीवनात अंगीकारून मनुष्य सर्वोच्च वर्ग, निरोगी समाज, समृद्ध जीवन प्राप्त करू शकतो.
जग बदलण्यासाठी स्वतःला बदला
श्री महावीरदेव हे कर्मशास्त्राचे प्रवर्तक होते. त्यांनी सांगितले की, तुमचे खरे जग तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला जग बदलायचे असल्यास स्वतःला बदला. हे जग कारण आणि परिणामाच्या नियमाने बांधलेले आहे. ज्याप्रमाणे झाडाची ब्लूप्रिंट त्याच्या बीजात असते, त्याचप्रमाणे आपण अनुभवत असलेल्या बाह्य घटनांची ब्लू प्रिंट आपल्या आत असते. त्याला कर्म म्हणतात. कर्माचा प्रभाव आत्म्याच्या शक्तीला प्रभावित करतो. त्याला निष्फळ बनविण्यास धर्म मदत करू शकतो. भगवान महावीरांनी धर्माची वैज्ञानिक व्याख्या ‘वत्थुसहावो धम्मो।’ या शब्दांत मांडली कोणत्याही पदार्थाचे मूळ स्वरूपाचे अस्तित्व हा त्याचा धर्म होय. धर्माला आचरणाचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी ‘संघ’ नावाची संघटना स्थापन केली. इतरांना सुखी ठेवण्यासाठी त्यांनी स्वतः दुःख सहन करण्याचा आदर्श जगासमोर आपल्या जिवंत आचरणातून मांडला. यासाठी जग त्यांचे सदैव ऋणी राहील.
कर्माचे तत्त्व
शेवटचे तीर्थंकर श्री. महावीरदेव यांनी जगाला कर्माचे तत्त्व दाखवले. कर्म हा विश्वव्यवस्थेचा नियम आहे. कार्यकारणभावाच्या नियमाने जग चालते. आपल्या अनुभव, कृती, विचार, भावना, मन, अवचेतन मन आणि चेतनेमध्ये बदल आकार घेतात. चेतना बदलल्याने मनही बदलते. कर्मामुळे आपण चेतनेचे मूळ स्वरूप जाणू शकत नाही.
कर्मापासून मुक्त होण्याचे दोन मार्ग आहेत ते म्हणजे आत्मजागृती आणि निरपेक्ष प्रेम. आत्मजागृतीच्या अभावामुळे जगाशी प्रेमाचा आभास होतो. सांसारिक प्रेम स्वार्थी असते. त्याच्यामुळे नकारात्मक कर्माचे आकर्षण होते. त्याच्यावर मात करण्यासाठी निःस्वार्थी प्रेम आवश्यक आहे. कर्म ज्या भावनेशी बांधले जाते, नेमके त्याच्या विरुद्ध भावनेने नष्ट होते. कर्माच्या प्रक्रियेचे ज्ञान मिळविल्याने कर्म दूर करणे सोपे होते. निःस्वार्थी प्रेमाची अनुभूती आणि अभिव्यक्ती नकारात्मक कर्माच्या ऊर्जेला सकारात्मकतेमध्ये रूपांतरित करण्यासाठी उपयुक्त ठरते. निःस्वार्थी प्रेम अनुभवण्यासाठी ‘जाणूनबुजून कोणाला दुखवू नका’, ‘तुमचा अभिमान तुमच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीच्या मार्गात येऊ देऊ नका’, ‘नकारात्मक विचार टाळा’ आणि ‘अपराध्यालाही माफ करा’ या चार गोष्टींचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
जैन धर्म भारतातील प्राचीन श्रमण संस्कृतीचे वर्तमान प्रतिनिधित्व करतो. श्रमण संस्कृती ही त्याग, तप, संयम आणि अध्यात्म यावर आधारित आहे. जैन धर्म ही या श्रमण संस्कृतीची प्रमुख शाखा आहे. जैन धर्माने आपल्या व्यवहारात, संघव्यवस्था आणि तत्त्वांमध्ये समानतेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे.
- महेंद्र ऋषी युवाचार्य, श्रमण संघ
जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर श्री महावीरस्वामी हे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पुरुष होते. या जगातील प्रत्येक जीव समान आहे, ही वैश्विक कल्पना त्यांनी २६०० वर्षांपूर्वी दिली. जो आत्मा स्वतःमधील शक्ती समजून घेऊन तिला जागृत करू शकतो, तोच परमात्मा होऊ शकतो.
- श्रुतरत्न गणिवर्य श्री वैराग्यरतिविजयजी म.सा.
Web Title: Mahavir Jayanti 2022 Change Yourself To Change World Mahavira Gives Equality To All
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..