ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

‘नव्या युगाचे पाईक’ हे पुस्तक स्वातंत्र्यानंतरच्या ध्येयवादी पिढीच्या कर्तृत्व, चिंतन आणि समाजभानाचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे.
Navya Yugache Paik
Navya Yugache PaikSakal
Updated on

निरंजन आगाशे - editor@esakal.com

भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या दहा-पंधरा वर्षांत जन्मलेल्या पिढीपुढचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या धुमाळीत तयार झालेला ध्येयवादाचा पीळ लोपू न देता तो ‘सुराज्या’च्या कामी उपयोगात आणणे. ‘सुराज्य’ याचा अर्थ केवळ सरकार आणि प्रशासन नव्हे. या ‘सुराज्या’ला इतर कितीतरी पैलू होते. वक्तृत्व, चित्रकला, संगीत, चित्रपट, नाटक, लेखन, संघटन, समाजकारण, शिक्षण ही सगळीच क्षेत्रे जणू ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर...’ असे खुणावत होती. त्याला ज्या लोकांनी आपापल्या परीने प्रतिसाद दिला, आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली त्यांना आपल्या वाटचालीकडे मागे वळून पाहताना काय वाटते, याचा मागोवा ‘नव्या युगाचे पाईक’ या पुस्तकात शब्दांकित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com