राजवंश भारती : शुंग राजवंश

Marathi Article : इतिहासाची नेहेमी पुनरावृत्ती होत असते.. ‘हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ’, असं जे म्हणतात; त्याची कित्येक उदाहरणे सापडतात
Bharhut (Madhya Pradesh) Shunga carvings and pillars near the stupa.
Bharhut (Madhya Pradesh) Shunga carvings and pillars near the stupa.esakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

मौर्यवंशाचा बृहद्रथ राजा म्हणून अगदीच अयशस्वी ठरला. लोकांना त्याच्या नाकर्तेपणाचा अक्षरश: तिटकारा आला होता. त्याचा पूर्वज असलेल्या चंद्रगुप्ताने ज्या तडफेने ग्रीकांना हाकलून लावले होते, ती तडफ बृहद्रथाकडे औषधालाही नव्हती. त्याचा दुबळेपणा बघून डिमिट्रियस आणि मिनॅन्डर या ग्रीक राजांनी भारतावर पुन्हा आक्रमणे सुरू केली होती.

अशा आणीबाणीच्या वेळी मौर्यांचा सेनापती पुष्यमित्राने कणखरपणाने त्यांना युद्धात मार देत देत थेट सिंधूच्या पलिकडे हाकलले. तो 'शुंग' वंशाचा होता. मगध साम्राज्याचा सम्राट म्हणून स्वत: गादीवर बसला ( इ.स. पूर्व १८५). तिथून शुंग राजवटीला सुरुवात झाली. (nashik saptarang latest article on Shunga Dynasty marathi news)

इतिहासाची नेहेमी पुनरावृत्ती होत असते.. ‘हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ’, असं जे म्हणतात; त्याची कित्येक उदाहरणे सापडतात. मौर्य साम्राज्य स्थापन करताना चंद्रगुप्ताने जे धनानंदाबाबत केले, तेच कालांतराने मौर्यवंशाच्या बृहद्रथाबाबत घडले. राजा म्हणून बृहद्रथ अगदीच अयशस्वी होता.

लोकांना त्याच्या नाकर्तेपणाचा अक्षरश: तिटकारा आला होता. त्याचा पूर्वज असलेल्या चंद्रगुप्ताने ज्या तडफेने ग्रीकांना हाकलून लावले होते, ती तडफ बृहद्रथाकडे औषधालाही नव्हती. त्याचा दुबळेपणा बघून डिमिट्रियस आणि मिनॅन्डर या ग्रीक राजांनी भारतावर पुन्हा आक्रमणे सुरू केली होती.

अयोध्या (साकेत) ग्रीकांच्या ताब्यात गेली होती. देश जाण्याची वेळ आली‌. सम्राट मात्र अहिंसेचीच माळ जपत बसला होता. अशा आणीबाणीच्या वेळी मौर्यांचा सेनापती असलेल्या पुष्यमित्राने कणखरपणाने त्यांना युद्धात मार देत देत थेट सिंधूच्या पलिकडे हाकलले.

सेनापती पुष्यमित्र हा 'शुंग' वंशाचा होता. त्याने या देशघातक राजाविरुद्ध बंड केले आणि एका सैनिकी संचलनाच्या प्रसंगी त्याची हत्या केली. त्यानंतर मगध साम्राज्याचा सम्राट म्हणून स्वत: गादीवर बसला ( इ.स. पूर्व १८५). तिथून शुंग राजवटीला सुरुवात झाली.

हे 'शुंग' नाव एकाच शिलालेखात आढळून येतं. मध्य प्रदेशातील ‘भरहुत’ इथल्या स्तूपाच्या प्रवेशदाराच्या स्तंभावर ब्राह्मी लिपीत ‘शुगानाम राजे..’ अशी अक्षरे कोरली आहेत. हा उल्लेख शुंगवंशाचा आहे. तसेच अयोध्या धनदेव शिलालेख म्हणून जो ओळखला जातो, त्या शिल्पपट्टीवरती ‘पुष्यमित्र’ हे नाव ब्राह्मी लिपीत कोरले आहे. (latest marathi news)

Bharhut (Madhya Pradesh) Shunga carvings and pillars near the stupa.
न्यायदानाच्या विलंबावर उपाय काय?

काही इतिहासकारांनी, शुंग राजांनी बौद्धधर्माची बांधकामे सूडबुद्धीने तोडून टाकली असे दावे केले आहेत. ते दावे निरर्थक आहेत, हा इतिहास आहे. भरहुतचा स्तूप तर शुंग राजवटीत बांधला गेलाच, परंतु सांचीच्या सुप्रसिद्ध स्तूपाभोवतीचे नक्षीदार कठडेही शुंग राजांनीच बांधले आहेत.


पुष्यमित्राने सुमारे ३६ वर्षे राज्य केले. त्याने ग्रीकांवरील विजयानंतर ‘अश्वमेध यज्ञ’ केला होता; जो एखादा चक्रवर्ती सम्राटच करतो. सुप्रसिद्ध व्याकरणकार पतंजली हा पुष्यमित्राचा समकालीन होता. त्याच्या ‘महाभाष्य’ या ग्रंथात एके ठिकाणी ‘इह पुष्यमित्रम् यजामहे ..’ असा उल्लेख आहे.

तो वर्तमानकाळात केलेला आहे- भूतकाळात नाही. याचा अर्थ पतंजली निश्चितपणे पुष्यमित्राच्या काळात होता. भारताच्या इतिहासात पुष्यमित्राची कारकीर्द लक्षणीय आहे. स्वा. सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पानां’पैकी दुसरे पान सम्राट पुष्यमित्राचे आहे!

पुष्यमित्रानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र इ.स. पूर्व १४९ मधे राजा झाला. तो सुद्धा पराक्रमी होता. मुख्य म्हणजे तो कथानायक म्हणून प्रसिद्ध आहे. कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्रम्' या नाटकाचा तो नायक आहे. या नाटकात, तेव्हा विदिशा प्रांताचा प्रांतपाल असलेला राजकुमार अग्निमित्र आणि विदर्भ राजकन्या मालविका यांची प्रेमकथा तर आहेच; पण तिच्या जोडीने तत्कालीन राजकारण सुद्धा आहे.  (latest marathi news)

Bharhut (Madhya Pradesh) Shunga carvings and pillars near the stupa.
सत्यशोधक महिला परिषद

अग्निमित्राचा मुलगा वसुमित्र याचे युद्धातील पराक्रम, विदर्भराज यज्ञसेनाचा त्याने केलेला पराभव, विदर्भ राज्याचे द्विभाजन, पुष्यमित्राचा अश्वमेध यज्ञ, यवनांशी- म्हणजे ग्रीकांशी लढाया या घटनाही नाटकात दाखवल्या आहेत. याशिवाय, नंतरच्या काळात बाणभट्टाने लिहिलेल्या 'हर्षचरितमानसात' सुद्धा सम्राट पुष्यमित्राची कहाणी आहे.

ब्राह्मण ज्ञातीतील व्यक्तीने सम्राट होणे आणि राजवंश सुरू करणे ही गोष्ट शुंग वंशाद्वारे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडली. शुंग वंश एकूण ११२ वर्षे सत्तेवर होता. या काळात या वंशाचे पुष्यमित्र, अग्निमित्र, वसुज्येष्ठ, वसुमित्र, भद्रक, पुलिंदक, घोषवसु, वज्रमित्र, भागवत आणि देवभूती असे राजे होऊन गेले.

पण अग्निमित्रानंतरचा एकही राजा नाव घेण्याजोगा नव्हता. ओडिसा राज्यातील हाथीगुंफा इथल्या शिलालेखात नमूद केल्याप्रमाणे कलिंगराज खारवेल याने मगधाच्या 'शुंग राजाला' युद्धात पराजित केले होते. तो राजा बहुदा वसुज्येष्ठ असावा. भागवताची कारकीर्द नुसतीच दीर्घ होती. अखेरच्या देवभूतीची इ.स. पूर्व ७३ मधे त्याचा आमात्य वासुदेव काण्व याने हत्या केली आणि तेव्हापासून शुंग वंश संपून काण्व वंशाची राजवट आली.

Bharhut (Madhya Pradesh) Shunga carvings and pillars near the stupa.
‘वनतारा’तील वाटा आणि पळवाटा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com