New Technology Revolutionizes Agriculture
sakal
विविध आव्हानांचा सामना करणाऱ्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रत्यक्ष खर्च कमी करून नवतंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासंदर्भात रोडमॅप आखला आहे.
देशातील कृषी क्षेत्राला दरवर्षी विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. खते, बी-बियाणे, कीटकनाशकांचा वाढता खर्च, मजुरीचे वाढलेले दर, अनिश्चित हवामान तसेच वेळेवर न मिळणारा हमीभाव, याशिवाय पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही चांगले पीक घेता येत नाही.