
डॉ. कैलास कमोद
उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
स्वातंत्र्याची पहाट उगवली... सूर्य दिसला; पण तो फार थोड्यांना! कोट्यवधींपैकी फक्त काही शेकड्यांना. भारतीय माणसांचा खूप मोठा समूह सूर्यप्रकाशापासून वंचितच राहिला. त्यांच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊ शकला नाही. जीवनातल्या प्राथमिक गरजांपासूनही वंचित राहिलेल्या मोठ्या जनसमूहाविषयी भाष्य या गीतात आहे. ‘अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ असं कवी सांगत आहे.