मला जगभरातील आदिम संस्कृतीचं खूप अप्रूप आहे. आज निसर्गाचा ऱ्हास, पर्यावरणीय असंतुलन, जागतिक तापमान वाढ असे मुद्दे जगात जीवन-मरणाचा विषय झालेले असताना निसर्ग रक्षणाची गुरुकिल्ली असलेल्या आदिम संस्कृतीच्या अभ्यासाची गरज प्रकर्षानं जाणवते.
तुम्ही जगाचा नकाशा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की जिथं जंगल आहे, हिरवाई आहे तिथंच आदिवासी आहेत किंवा असंही म्हणता येईल, की जिथं आदिवासी आहेत तिथंच समृद्ध निसर्ग, हिरवाई आहे. मात्र आपल्या देशात आदिवासींच्या आदिम संस्कृतीला सतत हिणवण्याची आणि त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करण्याची एक चुकीची प्रथा चालत आलेली बघायला मिळते.