
अरविंद जगताप jarvindas३०@gmail.com
परदेशात स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड वाढत चाललीय. लाखो लोक एनआरआय होताहेत. गरीब किंवा श्रीमंत कुठल्याही आई-बापाच्या मनात आपल्या मुलाला परदेशात पाठवायचं स्वप्न आहे. अनिवासी भारतीय वाढताहेत. वाढू देत. खरी चिंता आहे, आपण मोठ्या संख्येने मनाने निवासी अभारतीय होत चाललोय?