Premium|Karnataka Campaign 1676 : कर्नाटक मोहीम (भाग एक)

Strategic Goals of Karnataka Campaign : मुघल–मराठा शांतता आणि आदिलशाहीचे दुर्लक्ष याचा फायदा घेत शिवाजी महाराजांनी सप्टेंबर १६७६ मध्ये कर्नाटक मोहीम हाती घेतली, ज्याचा मुख्य उद्देश संपत्ती आणि कोरोमंडल बंदरे जिंकून आदिलशाहीचा आर्थिक व लष्करी कणा मोडून काढणे होता.
Karnataka Campaign 1676

Karnataka Campaign 1676

esakal

Updated on

सप्टेंबर १६७६मधील मुघल–मराठा शांततेमुळे बहादुरखानाने पश्चिम सीमेवरील तुकड्या मागे घेऊन विजापूराविरुद्ध मोठे सैन्य उभारण्याची मोकळीक मिळविली. या नव्या मुघल धोक्यामुळे आदिलशाहीचे लक्ष उत्तर आणि पश्चिमेकडे खिळले असताना, शिवाजी महाराजांना आपली प्रदीर्घ योजना—पूर्वेकडे समुद्रकिनाऱ्यापर्यंत कूच करून आदिलशाही कर्नाटक जिंकण्याची—प्रत्यक्षात आणण्याची संधी प्राप्त झाली.

या मोहिमेमागे अनेक पायाभूत हेतू स्पष्टपणे दिसून येतात.कर्नाटक प्रांत संपत्ती, कृषिउत्पन्न आणि पूर्व किनाऱ्यावरील बंदरांमुळे प्राचीन काळापासून महत्त्वाचा मानला जात होता. आदिलशाहीचे मोठे आर्थिक अधिष्ठान या प्रदेशावर अवलंबून होते, विशेषतः मुघल आणि मराठा आघातांनी सल्तनतीचा प्रदेश संकुचित होत असताना युद्धखर्चाची भरपाई कर्नाटकातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच होत असे. त्यामुळे कर्नाटक जिंकल्यास आदिलशाहीचा आर्थिक कणा छेदला जाणे अपरिहार्य होते. पश्चिम किनाऱ्यावर मराठ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे आदिलशाहीकडे युद्धोपयोगी घोडे येण्याचा एकमेव मार्ग कोरोमंडल किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत सीमित झाला होता. भारतात घोड्यांची पैदास होत नसल्याने मध्य आशियातून होणारी घोड्यांची आयात पूर्णपणे समुद्री मार्गावर अवलंबून होती. हा पुरवठा तोडणे म्हणजे शत्रूच्या रणशक्तीवर थेट प्रहार करणे; आणि तोच पुरवठा स्वतःकडे खेचणे म्हणजे प्रचंड लष्करी लाभ मिळविणे असे समीकरण होते. कोरोमंडल बंदरे ताब्यात घेतल्यास आदिलशाहीची घोड्यांची जीवनदायी पुरवठा-शृंखला खंडित झाली असती. त्यामुळे शत्रूची रसद तोडून त्याला आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या कमकुवत करून शिवाजी महाराज अप्रत्यक्ष परंतु अचूक धक्का देऊ शकत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com