
शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
ओव्हल येथे झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात सिराजच्या गोलंदाजीला तोडच नव्हती. त्याक्षणी तो क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम गोलंदाज होता. त्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे आणि तेवढेच कौतुकही करायला हवे. ओव्हलमधील या कसोटीत बुमरा खेळणार नसल्यामुळे सर्व जबाबदारी आपल्यालाच पार पाडायची आहे, हे त्याच्या डोक्यात पक्के होते आणि त्याप्रमाणे तो लढला आणि ही मालिका त्याने अजरामर केली.