

T20 World Cup Final March 8 India
esakal
शैलेश नागवेकर- shailesh.nagvekar@esakal.com
विशिष्ट खेळपट्टीचा आग्रह नसावा
२०२३ मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अहमदाबादमध्ये भारताचे दोन सामने झाले, त्यातील पाकिस्तानला सहज पराभूत केले तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार झाली. अहमदाबादमधील काही खेळपट्ट्या काळ्या मातीच्या आहेत. वानखेडेवरील सर्व खेळपट्ट्या लाल मातीच्या आहेत. त्यात आपला संघ हमखास यश मिळवतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यातील काळ्या मातीच्या खेळपट्टीची तयारी भारतीय संघ व्यवस्थापनाकडून काही बदलासाठी आग्रह धरण्यात आला होता, असे सांगण्यात येत होते. त्यानंतर प्रत्यक्ष सामन्यात काय घडले ते सर्वांनाच माहीत आहे. आता या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा आफ्रिकेविरुद्धचा सामना अहमदाबादमध्ये झाला आणि त्यात आफ्रिकेविरुद्ध एकतर्फी हार झाली. आजच्या सामन्यासाठीही काळ्या मातीचीच खेळपट्टी असेल; पण त्यात बदल करण्याचा आग्रह धरला जाऊ नये. खेळपट्टीपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. शेवटी प्रामाणिकपणाने केलेल्या