
विष्णू सोनवणे- saptrang@esakal.com
बेस्ट पतपेढीची ही निवडणूक या वेळी चर्चेत आली, ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निवडणुकीतील सहभागामुळे. हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र आले. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या दोघा भावांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होऊ लागली होती. त्यांच्या एकत्र येण्याचे सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले होते. या घटनेमुळे होऊ घातलेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.