vadapav and misal
sakal
आयुष्याचं संचित तुम्ही किती संपत्ती जमवली यात नसून, तुम्ही किती माणसं जोडली यात असतं. पैसे अनेक मार्गांनी कमविता आले तरी त्यातून जीवाला जीव लावणारी माणसं मिळतीलच असं नाही. त्यापेक्षा चांगली माणसं आयुष्यात असतील तर पैसा ही बाब गौण ठरते. पेणच्या तांडेल कुटुंबाने आयुष्यात हेच तत्त्व अंगीकारल्याचे दिसते. म्हणूनच शून्यातून सुरुवात करून आज नथुराम तांडेल यांची तिसरी पिढी समाधानी आयुष्य जगत आहे.