आदिवासींची ओळख त्यांच्या देवे या समूहावरून कशी व्हायची ते मागच्या भागात आपण पाहिलं. प्राचीन काळात अगदी आर्यांमध्ये सुद्धा सगोत्र विवाह व्हायचे, ग्रीकांमध्ये शुद्ध राजवंशाचं रक्त राखण्यासाठी सख्ख्या बहीण-भावाची लग्न लावली जायची. त्याच्या कित्येक वर्षांपूर्वी आदिवासींनी एकाच रक्तात नव्हे तर कुटुंबातही जैविक संबंध येऊ नये म्हणून ही व्यवस्था निर्माण केली होती.