saptarang
sakal
- हर्ष भटकळ, saptrang@esakal.com
चित्रकार व मांडणीशिल्पकार वीर मुन्शी यांची कला कधीच स्थिर किंवा अपरिवर्तनीय नव्हती. बदलती भौगोलिक परिस्थिती, राजकीय उलथापालथ, विस्थापित होणे, वैयक्तिक पातळीवरचे ‘गमावणे’, सांस्कृतिक जडणघडण यांचा त्यावर परिणाम आहे. तो सहन करत ती सारखे प्रश्न विचारते, की या संघर्षमय जगात नैतिकता कशी पाळावी?... त्यांचा प्रवास फक्त कोण्या एक कलाकाराचा नाही, तर इतिहासाशी जुळवून घेणाऱ्या माणसाचा आहे.