

Farmers Who Repaid Loans Regularly in Satara district Await Official List
sakal
-उमेश बांबरे
सातारा : राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण असले, तरी निकषांच्या जंजाळात कोण टिकणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतकरी सध्या थकीत असून, त्यांच्या कर्जमाफीचे गणित सरकारच्या आगामी नियमावलीवर अवलंबून आहे. दुसरीकडे, नियमित कर्ज भरणाऱ्या अडीच लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.